Janjira

Janjira
Killa

Friday, December 23, 2011

सत्य

ऑफिस मधून येत होतो. कार मध्ये ९३.५ fm लागले होते. RJ  विचारत होता वर्ष भरात कोणी खोटे वागला असलात आणि ते जर सगळ्या पुण्याला सांगायचे असेल तर sms करा .........

एक sms केलेला फोन कॉलर सांगत होता, " मी एका दुकानात एक जीन्सचे  (ट्रायल रूम मध्ये) रु ९९९ /- चे स्टीकर काढून रु ४९९ /- चे लावले, आणि ती जीन्स रु ४९९/- ला विकत घेवून गेलो."

त्या बद्दल त्या radio स्टेशन कढून त्या कॉलरला एक स्पोर्ट्स bag आणि एक jacket  मिळाले.

मनात विचार आला.

सत्य

म्हणजे नेहमी आणि पहिल्यापासून खरे असणे 
                               कि
असत्य किंवा खोटे वागून नंतर त्याची कबुली देणे ? 


सत्यासाठी हरिश्चंद्राला राज्य सोडावे लागले पण इथे असत्यासाठी पारितोषिके ?

आणि हे सर्व radio वर जग जाहीर करताना radio सारखे माध्यम असत्याला पाठींबा तर देत नाहीना ?
कारण आज सत्य बोलले तर काहीच मिळत नाही पण असत्याचा गवगवा केला तर बक्षिसे मिळतात

No comments: